Posts

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज

Image
                देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह  आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार आहे.              या योजनेत देशातील 30 लाख कारगीरांना लाभ मिळेल. विश्वकर्मा योजनेत एक लाख रुपयांपर्यंत स्वस्त व्याजदराने कर्जच मिळेलच. पण या कारागीरांना प्रशिक्षण आणि इतर अनेक सोयी-सुविधा मिळतील. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी 2023 मधील अर्थसंकल्पात केली होती. 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती दिनी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.              16 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजूरी देण्यात आली. यंदाच

सुकन्या समृद्धी योजना

Image
  सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरजू नगरिकांना आर्थिक मदत किंवा सहाय्य करत असते, या योजना नागरिकांचे सर्वांगीण कल्याण आणि विकास साधण्यासाठी राबविल्या जातात, तसेच या योजनांच्या माध्यमातून गरीब व साधारण जनतेचे जीवनमान उंचावणे त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळेस आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि तसेच देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करणे त्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश या योजनांच्या माध्यमातून शासनाला साध्य करण्याचा असतो. मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबीपणे जीवन जगता यावे तसेच मुलींचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

Image
     राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्प्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत "जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी" फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ऐंशी टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फलबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल व ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य होण्यास मदत होणार आहे.      उपरोक्त पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड

Vruksh Lagvad, आपल्या शेतात व बांधावर वृक्ष लागवडीसाठी मिळणार अनुदान, रोजगार हमी योजना

Image
  वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. साधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात 20 टक्क्यांच्या आसपास क्षेत्र वनाखाली आहे. वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी, शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्र, शेताचे बांध यावर शेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे. म्हणून शासनाने सन 2018 पासून  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेत. यासाठी शासन अनुदान देणार आहे.   योजनेचा लाभ घेऊ शकणारे लाभार्थी १. अनुसूचित जाती २. अनुसूचित जमाती ३.विमुक्त जाती/भटक्या जमाती ४. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी ५. स्रीकर्ता असलेली कुटुंबे ६.अल्पभूधारक शेतकरी ७.जमीन सुधारणांचे लाभार्थी ८.आवास योजनेचे लाभार्थी               योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. १.विहित नमुन्यातील अर्ज भरून

सर्वांना मिळणार 5 लाखाचा विमा, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे एकत्रीकरण

Image
                                    राज्यात यापूर्वी केसरी व अंतोदय शिधापत्रिका धारकांनाच मिळणारा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ यापुढे सर्व नागरिकांना मिळणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसोबत या योजनेच्या एकत्रित अंमलबाजवणीमुळे लाभार्थी दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट असलेले उपचार घेऊ शकणार आहे.                      राज्यातल्या सर्व जनतेला आता 5 लाखांचा विमा दिला  जाणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने राज्यातल्या साडे बारा कोटी जनतेला 5 लाखांचा आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना 5 लाखांचा विमा लाभ घेता येईल. सुरवातीला योजनेची 2 कोटी कार्ड वाटली जातील. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सरकार सुरू करणार आहे. यासाठी 210 कोटींच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात ही योजना सर्वांसाठी असेल. लाल, पिवळे, केसरी सर्व रेशनकार्डसाठी ही योजना लागू असेल. 

PM Kisan Yojana शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार

Image
      पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना  वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार  राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील निर्णय घेण्यात आला आहे.       नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात बारा हजार रुपये जमा होणार आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून, शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत.       नवीन आलेल्या GR नुसार या योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल व पी एम किसान पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले असेल ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. जर पीएम किसन पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.        पी एम किसान योजनेच्या PMFS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरण वेळी पात्र ठरलेल लाभार्थी नमो शेतकरी स

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

Image
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ. स. १८७४  रोजी कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे  राजे चौथे शिवाजी  महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.   २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई  येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्ह